Sunday, 15 May 2016

सैराट

 सैराट चित्रपटावर काहीच बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण अस्वस्थ झालोय म्हणून पुन्हा लिहायचं ठरवलं.ही चित्रपटाची समीक्षा नाहीय बरं. 
  खरतर भारतीय चित्रपट रसीक चित्रपट केवळ मनोरंजनासाठीच पाहतात. दिग्दर्शकाला काय म्हणायच आहे. काय सांगायच आहे. या नजरेन हे चित्रपट कधीच पाहतं नाहीत. 'हा सिन बरोबर नव्हता तो असा हवा होता'. असा मेकिंगच्या दृष्टीने विचार करतात आणि इथच घोळ करुन बसतात. पण दिग्दर्शकाने तो सिन तसाचं का घेतला असावा याचा विचार फारस कोण करतं नाहीत असो.
   सैराट चित्रपटावर बोलायचं म्हणजे नेमक कशावर बोलायचं Direction, Story, Music, Cinematography का या चित्रपटात सहज साकारलेल्या पात्रांबद्दल. सांर काही अद्भूत आहे. ह्या चित्रपटातलं कथानक खेड्यातली प्रेमकथा आहे. मग या चित्रपटाचा बाज ही खेड्यातलाचं असणारं. हा चित्रपट पाहतं असताना कॉलेज जीवनात आवडणारी मुलगी, तिच्यावर होणारं प्रेम, तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मित्रांकडून होणारी मदत हे प्रत्येकजण स्वत:शी रिलेट केल्याशिवाय राहतं नाही. खरं तर प्रेमाला कसलचं बंधन नाही. ना जाती धर्माचं, ना वयाचं.  प्रेम हे स्त्री आणि पुरुष या दोनचं जाती मध्ये होतं. हेच वास्तव नागराज मंजुळे यांनी सैराट या चित्रपटात मांडलयं.
     चित्रपट प्रदर्शीत होण्या अगोदरचं रिंकू राजगुरु म्हणजे आर्चीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटात साकारलेली आर्ची पाटलाची मुलगी असल्यानं तिच्यातल्या पाटीलकीचा अॅटीट्यूड शेवटच्या सिन पर्यंत जसाच्या तसां आहे. घोडा चालवनं, मुलांना विहीरीतुन बाहेर काढून उड्या मारणं, पोहणं, बुलेट घेऊन कॉलेजला जानं, मंग्याला धमकावन, ट्रॅक्टर घेऊन शेतावरं जानं, परश्याच्या आईला आत्या म्हणनं,  रस्त्यावर नाचंन, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केलेला कागद पोलिसांसमोर फाडनं, घरच्यांवर बंदूक चालवनं, परश्याला पळवून नेन्यापर्यंत एकुणचं चित्रपटातं उत्तम पात्र तीन साकारलयं. खरतरं रिंकुने नागराजच्या आर्ची या पात्राला खरचं न्याय दिला असं म्हणावं लागेलं. आर्ची बरोबर परश्या (आकाश ठोसर) 
परश्याचे मित्र लंगड्या उर्फ प्रदिप बनसोडे (तानाजी गलगुंडे), सल्या (अरबाज शेख), आणि आर्चीची मैत्रीण आनी (अनुजा मुळे) या ही पात्रांनी उत्कृष्ठ अभिनय साकारला आहे. 
     खालच्या जातीचा परश्या (भारतात असलेल्या जातीव्यवस्थेवरुन) वरच्या जातीच्या आर्चीवर प्रेम करतो. जेवढं प्रेम परश्या आर्ची वर करतो तेवढचं प्रेम आर्ची ही परश्यावर करते. हे जेव्हा आर्चीच्या घरी समजतं तेंव्हा आर्चीचे वडील तात्या, आर्चीचा भाऊ प्रिंन्स आर्चीला तर मारतातच आणि परश्याला मारून 'गाव सोडून जा नाहीतर कापून उसात फेकून देईन' असं परश्याच्या कुटुंबाला धमकावतात. इथचं भारतात असलेल्या विषमतेच दर्शन घडतं. पण भारतात गाव खेड्यापासून चालतं आलेली ही विषमता नवी नाहीय. पूर्वी ही असचं घडत होतं आणि आज ही असचं घडतय. पण त्याच्याकडे कोनचं लक्ष देत नाही. 
   परश्याचा बाप परश्याला करमाळ्याला पाठवतो. दोन जीव एकमेकांपासून वेगळे होतात. परश्या आर्चीसाठी झुरत असतो. तिकडे आर्चीसाठी स्थळ ही बोलवलेलं असतं. घरच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि पारश्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आर्चीला परश्याचा जिवलग मित्र लंगड्या (प्रदीप) घेऊन येतो आणि तिथून हे दोन जीव एकमेकांची सोबत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोडतं नाहीत. शेवटची दोन मिनिटं विदाऊट sound आणि लहान तात्याचे रक्ताने माखलेल्या पावलाचे ठसे काळजाचा थरकाप उडवतात. का केला असेल बर तो आवाज म्युट? का दिलं नसेल Background music? ज्या चिमुकल्याला जात काय आहे? हे माहीत ही नसताना. रक्ताने बरबटलेल्या आई वडीलांना पाहुनं त्याच्या रडण्याचा आवाज का येतं नव्हता?  त्या चिमुकल्याची किंचाळी का एैकू आली नाही? ही दोन मिनीटं थेटर सुन्न का झालं होतं?  पाहणार्यांचा श्वास का रोखला गेलेला होता? हे सार आठवल तरी आज ही मन अस्वस्थ होतयं. 
   सभोवताली हे सार घडतं असताना. सैराटला काही स्वयंघोषित संस्कृती रक्षक लोक आणि संघटना विशिष्ट एका जातीच्या चैकटीत बघतात. पाटलांच नाव वापरुन मराठा समाजाला बदनाम केलं आहे. असं त्यांच म्हणनं आहे. खर तर यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते. या संपुर्ण चित्रपटात कोणतीचं जात अधोरेखीत केलेली नाहीय. तर भारतात असलेल्या जातीभेदावर भाष्य केलं गेलयं. मग भारतात अश्या ऑनर किलींगच्या घटना घडल्या नाहीत का? सोनई हत्याकांडामध्ये वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून त्या मुलाचे तुकडे करुन मारलं. नगर जिल्ह्यातल्या खर्डा या ठिकाणी दगड फोडणार्याचा अल्पवयीन मुलगा गावातल्या सवर्ण मुलीवर प्रेम करतोय म्हणून त्याला मारुन फासावर लटकवलं. काही महिण्यांपुर्वी कोल्हापुर मध्ये एका ब्राम्हणाच्या मुलाने पाटलाच्या मुलिशी लग्न केलं म्हणून त्या दोघांचा ही खुन केला. जे समाज्याचं वास्तव आहे ते चित्रपटारुपी समोर आनलं तर आता त्याला ही विरोध करतायतं. 
    जर खरचं आर्ची ने परश्यावर असलेल्या प्रेमा बद्दल तिच्या घरी सांगीतलं असतं तर? 
तीच्या प्रेमाला तिच्या घरच्यांनी सहमती दिली असती का? 
आर्ची आणि परश्या यांच्या लग्नाला परवानगी दिली असती का? 
जर दिली नसती तर काय केलं असतं? 
जर परश्याशी लग्न लाउन दिलं असतं तर जातपंचायतीसमोर परश्याच्या वडिलांना थोबाडीत मारुन घेण्याची गरज पडली असती का? 
प्रेमात जीव देण्यात काहीच शहानपणा नाही. पण तुमची संस्कृती, तुमचा समाज, तुमचे विचार खालच्या जातीच्या परश्याने वरच्या जातीच्या आर्चीशी केलेलं लग्न तुंम्ही मान्य का करु शकतं नाही?
यासारखे बरेच सारे प्रश्न मला पडतायतं. कदाचीत तुम्हालाही पडतं असतील. जर पडतं नसतील तर तुम्ही जिवंत नाही आहात. 
        
                     - के.प्रफुल्ल



No comments: