Saturday, 2 September 2017

नैराश्य

माणूस जगतं असताना दैनंदिन जिवनात त्याला वेगवेगळ्या घटनांना, वाईट प्रसंगांना, अडचणींना सामोरं जावं लागतं. काही माणसं अश्या घटनांना धाडसानं सामोरं जातात. तर काही घाबरुन टाळण्याचा प्रयत्न करतं. अश्या घटनांना सामोरं जाताना माणसाला नैराश्याचा सामना करावा लागतो. नैराश्य हे फक्त तरुण वयातच येतं असं नाही. कळायला लागलेल्या लहान वयापासुन ते मृत्यूपर्यंत माणूस नैराश्येच्या छायेत गुरफटलेला असतो. माणसाला वयाच्या या विविध टप्प्यात नैराश्येला सामोरं जावं लागतं. 
      एखादा कळता लहान मुलगा जेंव्हा एखाद्या गोष्टीसाठी आई वडिलांकडे हट्ट करतो. ती गोष्ट त्याला नाही मिळाली म्हणजे तो दु:खी होतो. निराश होतो. जे वय खेळण्या बागडण्याचं असतं त्या वयात काही मुलं बंद खोलीत बसून अहो रात्र अभ्यास करताना दिसतात. मग परिक्षेत एखादा गुण जरी कमी पडला तर लगेच निराश होऊन बसतात. काही माणसं आपल्या मुलांकडून इतका अभ्यास करुन घेतात. जेवढा त्यांनी आपल्या शैक्षणीक आयुष्यात कधीच केलेला नसतो. काही माणसं तुला डॉक्टर व्हायचय, इंजिनीयर व्हायचय म्हणून स्व:ता ची स्वप्न आपल्या मुलांवर लादत असतात. पण मुलांच्या मनाचा त्यांनी कधीच विचार केलेला नसतो. अशी माणसं आपल्या मुलांना स्पर्धेच्या युगात चालायला तर शिकवतात, पण जगायला नाही शिकवू शकतं. त्याला जिंकायची सवय लावतात. पण अपयश पचवायची नाही. म्हणून अशी मुलं एखादा गुण कमी मिळाला तरी निराश होतात. छोटसं ही अपयश पचवण्यची त्यांची कुवत नसते.
     तरुण वयात असणाऱ्या मुलां मुलींमध्ये प्रेम प्रकरणावरुन नैराश्य येण्याच प्रमाण आपल्याला खुप पहायला मिळतं. मुलीकडून किंवा मुलाकडून नकार मिळाल्याने मुलं मुली हताश होतात. निराश होतात. हि निराश्या अनेक मुलांना व्यसनाकडे घेऊन जाते. तर काही प्रेम प्रकरणातल्या नायक नाईकेला प्रेमभंग ही आयुष्यातली फार महत्वाची लढाई वाटतं असते. त्यात अपयश मिळवल्यामुळं काही तरुण मुलं मुली आत्महत्येचा पर्याय ही निवडतात. प्रौढ माणसं ही घरगुती किंवा वैयक्तीक कारणांमुळे, ऑफिसमध्ये वरीष्टांकडून मिळणाऱ्या वर्तणुकीमुळे, कर्ज अशा अनेक गोष्टीत सतत अडकलेली दिसतात. या कारणांमुळे ते निराश होतात. अशी माणसं दारु, सिगारेट अश्या व्यसनांना बळी पडलेली दिसुन येतात. तर वयोवृध्द माणसं सुध्दा घरगुती कारणांमुळे आणि आजारपणामुळे निराश्येत जगतं असतात.
      मग आपण जगत असताना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणाने निराश्या अनुभवलेली असते. जेंव्हा आपण निराश होतो. तेंव्हा आपल्याला समुपदेशाची गरज असते. आपण लहान असताना आपल्या अडचणी आपल्या आईवडीलांना सांगत असतो. तेंव्हा समुपदेशकाची भुमिका आपले आईवडील पार पाडतात. किंवा आत्ताही आपल्या कुटूंबातल्या छोट्या मुलांच्या अडचणी भाऊ, बहिण, आई, वडिल, आजी, अजोबा कोणी ना कोणी सोडवतं असतं. त्यामुळे हि लहान मुलं कधी निराश होताना  दिसतं नाहीत. हिचं मुलं जेव्हा तरुण होतात तेंव्हा समुपदेशकाची भुमिका पालकांएैवजी मित्र मैत्रीण पार पाडतात. पण मित्र मैत्रीण समवयीन असल्यानं त्यांचे सल्ले योग्य असतीलचं असं नाही. कारण ते ही या अश्याच अडचणीतून चाललेले असतात. एखादा तरुण तरुणी प्रेमात पडल्याचं किंवा प्रेमभंग झ्याल्याचं आईवडीलांना कधीचं सांगत नाहीत. त्याची कारणं ही बरीच आहेत. तेंव्हा तरुण वयातली मुलं मुली इथेचं भरकटतात. निराश होऊन वाईट मार्गाला लागतात. अश्या गोष्टी, घटना, अडचणी आईवडीलांसोबत व्यक्त करण्यची हिच योग्य वेळ असते. अश्या वेळी आईवडीलांनी मुंलांना रागवण्या, मारण्या एैवजी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं तर आपला मुलगा मुलगी वाया जाणार नाही. याची खबरदारी घेता येते आणि येणारी पिढी निराशयुक्त, व्यसनमुक्त व्हायला वेळ लागणार नाही.  
                                                                                                 -के.प्रफुल्ल