Sunday, 15 May 2016

सैराट

 सैराट चित्रपटावर काहीच बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण अस्वस्थ झालोय म्हणून पुन्हा लिहायचं ठरवलं.ही चित्रपटाची समीक्षा नाहीय बरं. 
  खरतर भारतीय चित्रपट रसीक चित्रपट केवळ मनोरंजनासाठीच पाहतात. दिग्दर्शकाला काय म्हणायच आहे. काय सांगायच आहे. या नजरेन हे चित्रपट कधीच पाहतं नाहीत. 'हा सिन बरोबर नव्हता तो असा हवा होता'. असा मेकिंगच्या दृष्टीने विचार करतात आणि इथच घोळ करुन बसतात. पण दिग्दर्शकाने तो सिन तसाचं का घेतला असावा याचा विचार फारस कोण करतं नाहीत असो.
   सैराट चित्रपटावर बोलायचं म्हणजे नेमक कशावर बोलायचं Direction, Story, Music, Cinematography का या चित्रपटात सहज साकारलेल्या पात्रांबद्दल. सांर काही अद्भूत आहे. ह्या चित्रपटातलं कथानक खेड्यातली प्रेमकथा आहे. मग या चित्रपटाचा बाज ही खेड्यातलाचं असणारं. हा चित्रपट पाहतं असताना कॉलेज जीवनात आवडणारी मुलगी, तिच्यावर होणारं प्रेम, तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मित्रांकडून होणारी मदत हे प्रत्येकजण स्वत:शी रिलेट केल्याशिवाय राहतं नाही. खरं तर प्रेमाला कसलचं बंधन नाही. ना जाती धर्माचं, ना वयाचं.  प्रेम हे स्त्री आणि पुरुष या दोनचं जाती मध्ये होतं. हेच वास्तव नागराज मंजुळे यांनी सैराट या चित्रपटात मांडलयं.
     चित्रपट प्रदर्शीत होण्या अगोदरचं रिंकू राजगुरु म्हणजे आर्चीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटात साकारलेली आर्ची पाटलाची मुलगी असल्यानं तिच्यातल्या पाटीलकीचा अॅटीट्यूड शेवटच्या सिन पर्यंत जसाच्या तसां आहे. घोडा चालवनं, मुलांना विहीरीतुन बाहेर काढून उड्या मारणं, पोहणं, बुलेट घेऊन कॉलेजला जानं, मंग्याला धमकावन, ट्रॅक्टर घेऊन शेतावरं जानं, परश्याच्या आईला आत्या म्हणनं,  रस्त्यावर नाचंन, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केलेला कागद पोलिसांसमोर फाडनं, घरच्यांवर बंदूक चालवनं, परश्याला पळवून नेन्यापर्यंत एकुणचं चित्रपटातं उत्तम पात्र तीन साकारलयं. खरतरं रिंकुने नागराजच्या आर्ची या पात्राला खरचं न्याय दिला असं म्हणावं लागेलं. आर्ची बरोबर परश्या (आकाश ठोसर) 
परश्याचे मित्र लंगड्या उर्फ प्रदिप बनसोडे (तानाजी गलगुंडे), सल्या (अरबाज शेख), आणि आर्चीची मैत्रीण आनी (अनुजा मुळे) या ही पात्रांनी उत्कृष्ठ अभिनय साकारला आहे. 
     खालच्या जातीचा परश्या (भारतात असलेल्या जातीव्यवस्थेवरुन) वरच्या जातीच्या आर्चीवर प्रेम करतो. जेवढं प्रेम परश्या आर्ची वर करतो तेवढचं प्रेम आर्ची ही परश्यावर करते. हे जेव्हा आर्चीच्या घरी समजतं तेंव्हा आर्चीचे वडील तात्या, आर्चीचा भाऊ प्रिंन्स आर्चीला तर मारतातच आणि परश्याला मारून 'गाव सोडून जा नाहीतर कापून उसात फेकून देईन' असं परश्याच्या कुटुंबाला धमकावतात. इथचं भारतात असलेल्या विषमतेच दर्शन घडतं. पण भारतात गाव खेड्यापासून चालतं आलेली ही विषमता नवी नाहीय. पूर्वी ही असचं घडत होतं आणि आज ही असचं घडतय. पण त्याच्याकडे कोनचं लक्ष देत नाही. 
   परश्याचा बाप परश्याला करमाळ्याला पाठवतो. दोन जीव एकमेकांपासून वेगळे होतात. परश्या आर्चीसाठी झुरत असतो. तिकडे आर्चीसाठी स्थळ ही बोलवलेलं असतं. घरच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि पारश्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आर्चीला परश्याचा जिवलग मित्र लंगड्या (प्रदीप) घेऊन येतो आणि तिथून हे दोन जीव एकमेकांची सोबत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोडतं नाहीत. शेवटची दोन मिनिटं विदाऊट sound आणि लहान तात्याचे रक्ताने माखलेल्या पावलाचे ठसे काळजाचा थरकाप उडवतात. का केला असेल बर तो आवाज म्युट? का दिलं नसेल Background music? ज्या चिमुकल्याला जात काय आहे? हे माहीत ही नसताना. रक्ताने बरबटलेल्या आई वडीलांना पाहुनं त्याच्या रडण्याचा आवाज का येतं नव्हता?  त्या चिमुकल्याची किंचाळी का एैकू आली नाही? ही दोन मिनीटं थेटर सुन्न का झालं होतं?  पाहणार्यांचा श्वास का रोखला गेलेला होता? हे सार आठवल तरी आज ही मन अस्वस्थ होतयं. 
   सभोवताली हे सार घडतं असताना. सैराटला काही स्वयंघोषित संस्कृती रक्षक लोक आणि संघटना विशिष्ट एका जातीच्या चैकटीत बघतात. पाटलांच नाव वापरुन मराठा समाजाला बदनाम केलं आहे. असं त्यांच म्हणनं आहे. खर तर यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते. या संपुर्ण चित्रपटात कोणतीचं जात अधोरेखीत केलेली नाहीय. तर भारतात असलेल्या जातीभेदावर भाष्य केलं गेलयं. मग भारतात अश्या ऑनर किलींगच्या घटना घडल्या नाहीत का? सोनई हत्याकांडामध्ये वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून त्या मुलाचे तुकडे करुन मारलं. नगर जिल्ह्यातल्या खर्डा या ठिकाणी दगड फोडणार्याचा अल्पवयीन मुलगा गावातल्या सवर्ण मुलीवर प्रेम करतोय म्हणून त्याला मारुन फासावर लटकवलं. काही महिण्यांपुर्वी कोल्हापुर मध्ये एका ब्राम्हणाच्या मुलाने पाटलाच्या मुलिशी लग्न केलं म्हणून त्या दोघांचा ही खुन केला. जे समाज्याचं वास्तव आहे ते चित्रपटारुपी समोर आनलं तर आता त्याला ही विरोध करतायतं. 
    जर खरचं आर्ची ने परश्यावर असलेल्या प्रेमा बद्दल तिच्या घरी सांगीतलं असतं तर? 
तीच्या प्रेमाला तिच्या घरच्यांनी सहमती दिली असती का? 
आर्ची आणि परश्या यांच्या लग्नाला परवानगी दिली असती का? 
जर दिली नसती तर काय केलं असतं? 
जर परश्याशी लग्न लाउन दिलं असतं तर जातपंचायतीसमोर परश्याच्या वडिलांना थोबाडीत मारुन घेण्याची गरज पडली असती का? 
प्रेमात जीव देण्यात काहीच शहानपणा नाही. पण तुमची संस्कृती, तुमचा समाज, तुमचे विचार खालच्या जातीच्या परश्याने वरच्या जातीच्या आर्चीशी केलेलं लग्न तुंम्ही मान्य का करु शकतं नाही?
यासारखे बरेच सारे प्रश्न मला पडतायतं. कदाचीत तुम्हालाही पडतं असतील. जर पडतं नसतील तर तुम्ही जिवंत नाही आहात. 
        
                     - के.प्रफुल्ल



Sunday, 8 May 2016

125 वी जयंती

बाबासाहेबांची जयंती आता थोड्याच दिवसावर येऊन ठेपलीय. जयंतीची तयारी आता जगभरात सर्वत्र चालू आहे. 125 वा बाबासाहेबांचा जन्मदिवस केंद्र सरकार ही समतेचे वर्ष म्हणून देशभर साजरं करतय.
      बाबासाहेबांना मुर्ती पुजा मांन्य नव्हती. त्यांचा मुर्ती पुजेला विरोध होता. तरीही आम्हीच त्यांच्या मुर्तीची पुजा करतोय. पुतळ्या पासुन फोटोच्या फ्रेम पर्यंत आणि किल्लीच्या किचन पासुन गळ्यातल्या लॉकेट पर्यंत आम्हीच त्यांना कैद केलय. बंद केलयं. बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी, म्हणून त्यांनी आम्हाला गुलामगीरीतुन मुक्त केलं नाही. त्यांचा जयजयकार व्हावा, म्हणून त्यांनी आमच्या गळ्यातलं लोटकं आणि कंबरेचा झाडू काढला नाही. त्यांची मिरवणूक निघावी, म्हणून त्यांनी आम्हाला जनावरातून माणसात आणलं नाही. तर आम्हाला सर्व जाती धर्माप्रमाणे समाणतेची वागणूक मिळावी. खर्या अर्थानं आम्ही माणूस म्हणून जगावं. यासाठी त्यांनी दिवस रात्र संघर्ष केला. हजारो संसार उभारण्यासाठी स्व:ताच्या संसाराकडे उभ्या आयुष्यात त्यांना लक्ष देता नाही आलं. आम्हाला माणूस बनवण्यासाठी त्यांनी निस्वार्थीपणे मनुवाद्यांशी संघर्ष केला. एवढा त्याग त्यांनी सहन केला. ते केवळ त्यांची जयंती साजरी करण्यासाठी नाही. आणि आज ही आम्ही तेच करत आलोय.
     बाबासाहेबांचे विचार आम्ही कधीच आत्मसात केले नाही. त्या काळच्या शाहीरांनी आणि जलसा कारांनी सांस्कृतीक चळवळीतून त्यांचे विचार शहरात, खेडोपाडी, वस्त्या-वस्त्यात घरा-घरात पोहचवले. आज त्यांच्या जयंतीला DJ वाजवला जातो. मिरवनुकीपुढे नाचलं जातं. पण DJ वाजवून आणि नाचून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचनार का? शेतात भर उन्हात राबनारी माऊली या जयंतीला चार पाचशे रुपये वर्गणी न चुकता देते. एसी ऑफिसमध्ये बसनारा आमचा साहेब ही पाचशे हजार रुपये वर्गणी देतो. आणि आम्ही त्या पैशाची धुळंदान करतो. बाबासाहेबांच्या जयंतीला आणि मिरवणूकीला पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. तोच पैसा समाजातल्या गरीब हुशार मुलांच्या शिक्षण उच्चशिक्षणासाठी खर्च केला, वस्त्यांमध्ये ग्रंथालयांची उभारणी केली, शैक्षणीक संस्था उभारल्या तरच बाबासाहेबांच कार्य पुर्णत्वास जाईल. पण जर का मी असं जयंती मंडळाला बोललो. तर जयंतीला विरोध करतोस म्हणून मलाच विरोधक समजतील. मग तुमच्या विचारांचा वारसा आम्ही कसा पुढे नेणार?
      बाबासाहेबांची जयंती जर साजरी करायचीच असेल, तर त्यांच्या विचारांची जयंती साजरी केली पाहीजे. त्याचे विचार समाज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचवले पाहीजे. तरच बाबासाहेबांना अपेक्षीत असणारा भारत घडू शकेल. गरीबी आणि दारीद्र मुळे आजचा तरुण व्यसनाधीन बनत चालला आहे. अजून ही समाजात शिक्षणाला फारसं महत्व दिल जातं नाही. शिक्षणापासुन वंचित असलेल्या घटकाला त्याच्या हक्काचं शिक्षण मिळवून दिल पाहीजे.
    भारतातल्या सर्व स्त्रीयांना पुरुषांबरोबर समान वागणूक, समान अधीकार मिळावा अशी तरतूद बाबासाहेबांनी घटनेत केलेली आहे. पण स्त्रीयांनी समाजात चाललेल्या कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेऊ नये, म्हणून त्यांच चाललेलं काम बंध कसं पाडता येईल याचा विचार आपनं प्रत्येकजन करतोय. जर बाबासाहेबांनी केलेल्या कायद्याचे पालनं आम्हीच करत नसेल तर या देशातले राजकारणी, राजकीय पक्ष, भारतातले हे लोक या घटनेचे पालन कसे करतील. आपण त्या स्त्रीयांना त्याचा अधीकार केंव्हा देणार.
माझ्या गावात जयंतीनीम्मीत स्त्रीयांनी तुमच्या (बाबासाहेबांच्या) विचारांची चळवळ सुरु केलीय. पण आम्हीच त्या स्त्रीयांना मागे ओढतोय. त्या स्त्रीयांना आमचेच शिक्षीत आणि अशिक्षीत कार्यकर्ते विरोध करतायतं. तसही राज्यघटना सुपुर्द करताना तुंम्ही तुमच्या शेवटच्या भाषणात बोलले वाक्य मला आज ही आठवतय. घटना किती ही चांगली असो या घटनेचे पालन कर्ते जर निट नसतील तर ती घटना बिनकामाची आहे. आणि घटना कितीही वाईट असो या घटनेचे पालन कर्ते लोक जर व्यवस्थीत, काटेकोर पणे पालन करतील तर तिच घटना खुप काळ टिगते.
बाबासाहेब म्हणाले होते की, या देशात न्याय मागुन मिळतं नाही तर तो मिळवावा लागतो. समाजाचा सर्वांगीन विकास करायचा असेल तर राजकीय सत्तेत गेल्या शिवाय पर्याय नाही असे म्हणून त्यांनी आम्हाला शासनकर्ती जमात बनायला सांगीतलं होतं. पण आज ही आंम्ही गावापासुन दिल्लीपर्यंत राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेलेलो आहे. आम्ही त्याच्याचं पायाखालची धुळ चाटतो आहे.
   
    पण बाबा, एक दिवस येणार आणि तुमच्या विचाराचा आणि विचारांचाच वारसा अंखड चालू राहणार.
                               के.प्रफुल्ल

Friday, 6 May 2016

धगधगती रात्र...

राती दिड ला एडीटींगच काम संपवून पडलो होतो. झोप लागतं नसल्यानं या अगांवरुन त्या अंगावर होऊन झोपण्याचा प्रयत्न करत होतो. रुम मध्ये लाईट बंद केली असल्यानं अंधार पसरला होता. मंध्य रात्र असल्यानं तेवढीच शांतता होती. रुम मध्ये आणखी एकजण मोबाईलवर फिल्म बघत होता. त्याला काहीतरी जळल्याचा वास येऊ लागलां. तो फिल्म बघायचं थांबवून वास कुठून येतोय हे पाहू लागला. खिडकिच्या बाजूला झोपतं असल्यानं तो उठताच त्याच लक्ष खिडकीतं गेलं. तो घाबरला. रुम मधले बारा जण होते. उद्या ऑफिस असल्यानं सगळेच गाढं झोपले होते. तो  त्याच्या बाजूला झोपलेल्या मित्रांना उठवू लागलां. ते खिडकित बघू लागले. त्यांच्या घाबरण्याची चाहूल येव्हाना मला ही लागली होती. मी ही काय झालं म्हणतं खिडकीकडे जाऊ लागलो. खिडीकीतून बघून मी ही घाबरलो. वेळ होती रात्री दोन ची. रुमच्या समोर चौकटी पासुन दहा फुट अंतरावर भिंत होती. त्या भिंतीवर सोसायटीतल्या दहा घरांच्या लाईट मिटरची पेटी होती. त्या पेटीत आग लागली होती. सगळे रुमच्या बाहेर पळू लागले. झोपलेले बाराजन  आता उठले होते. शेजार्यांना उठवू लागले. "आग लागली, आग लागली" म्हणतं रुममधल्या सगळ्यांनी आख्खी सोसायटी जागी केली. आग वाढतं होती. सोसायटीतले पुरुष बाहेर पडले कोणी बनियन, चड्डी तर कोणी टॉवेल वर बाहेर आले. ज्यांच्या मोटारसायकली होत्या त्यांनी सुरक्षीत ठिकाणी हालवल्या. महिला आगीकडे बघून घाबरल्या होत्या. लहान मुलांना घेऊन सोसायटीच्या बाहेर रस्त्याकडे पळतं होत्या.आगीचा जोर वाढतचं होता. प्रत्येकजन आपण सुरक्षीत ठिकाणी कसे जाता येईल हे पहात होता. आम्ही मात्र त्या आगीकडे बघतं होतो. काय करायचं काहीचं कळतं नव्हतं. लाईट असल्यानं पाणी ओतून आगं विझवू शकतं नव्हतो. कोणी तरी म्हटलं सोसायटीच्या मेन गेटवर डिपी आहे. तो बंद केला तर आग आटोक्यात येईल. मी आणि रुम मधले मित्र त्या डिपीकडे धावतं गेलो. डिपी उघडला. फ्यूज काढायला कोणचं तयार नव्हतं. आरे काढ नां असा आवाज मला एैकू येत होता. ते मलाचं फ्यूज काढायला सांगत होते. फ्यूज काढायला कोणचं तयार नव्हतं. एका पेटी मध्ये आग लागली होती. आणि दुसरीकडे मी दुसर्या पेटीत फ्यूजला हात लावू का नको याला घाबरत होतो. घाबरतं धाडसं केलचं. डिपीत असणार्या तिन्ही फ्यूज काढल्या. आता सोसायटीतले तरुण फोन लावू लागले. कोणी 100 नंबर वर पोलीस स्टेशनला तर कोणी 107 नंबरला फायरब्रिगेडला. त्यानी पोलीसांना कळवलं. फायरब्रिगेडचा संपर्क होतं नव्हता. फ्यूज काढून ही आग आता खुपच वाढली होती. दिवाळीत जसे आकाशात कलरफुल्ल फटाके फुटतात तसे मीटर फटाफट फुटत होते. रुम मधले सगळेच घाबरले होते. कारण आमची रुम आगीच्या समोर आणि दहा फुटावर होती. बाहेरच्या वलानीला कपडे सुखायला टाकले होते. आगीचा लोळ कपड्यांना लागून दगा फटका रुमला होतो की काय? अस मनोमन वाटतं होतं. काय करायचं काहीच कळतं नव्हतं. डोक्यात राख पडल्यासारखं झालं होतं. बरेच लोक मातीने विझवा असं म्हणत होते. पण मुंबईसारख्या शहरात जमीन दिसनं मुश्किल. तर माती कुठून आणनार. माती पाहण्यासाठी तिघे चौघे पळत होते. आगीनं आता भयान रुप घेतलं होतं. पेटीच्या आत लागलेली आग आता घराच्या पत्र्यापर्यंत पोहचली होती. माती बघायला बाहेर गेलेल्यांनी वाळू आणली. विस पंचवीस फुटाच्या अंतरावरुन आगीवर वाळूचा मारा करु लागले. वाळू थोडीशी ओली असल्यानं आग आटोक्यात येतं होती. पंधरा विस मिनीटाच्या प्रयत्नाने आग विझली. आणि सोसायटीतल्या सगळ्यांचाच जिव भांड्यात पडला. सिनेमात घडतं अगदि तसं आग विझल्यावर पोलीस आणि फायरब्रिगेडचे जवान घटनास्थळी तीन वाजता पोहचले. संपुर्ण सोसायटीची झोप उडली होती. स्त्रीया लहान मुलालांना घेऊन सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर बसल्या होत्या. आगीचं हे भयान रुप पाहून आग विझवली तरीही, घरात जायला कोणी तयार नव्हतं. मिटरच्या पेटीला लागलेली आग आपल्या घरापर्यंत आली असती आणि आपण झोपलोच असतो तर? आपल्याला उठवलचं नसतं तर? या चिंतेत सोसायटीतल्या सार्यांनीच रात्र काढली असावी.
                                                                                                                              के.प्रफुल्ल