Sunday, 8 May 2016

125 वी जयंती

बाबासाहेबांची जयंती आता थोड्याच दिवसावर येऊन ठेपलीय. जयंतीची तयारी आता जगभरात सर्वत्र चालू आहे. 125 वा बाबासाहेबांचा जन्मदिवस केंद्र सरकार ही समतेचे वर्ष म्हणून देशभर साजरं करतय.
      बाबासाहेबांना मुर्ती पुजा मांन्य नव्हती. त्यांचा मुर्ती पुजेला विरोध होता. तरीही आम्हीच त्यांच्या मुर्तीची पुजा करतोय. पुतळ्या पासुन फोटोच्या फ्रेम पर्यंत आणि किल्लीच्या किचन पासुन गळ्यातल्या लॉकेट पर्यंत आम्हीच त्यांना कैद केलय. बंद केलयं. बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी, म्हणून त्यांनी आम्हाला गुलामगीरीतुन मुक्त केलं नाही. त्यांचा जयजयकार व्हावा, म्हणून त्यांनी आमच्या गळ्यातलं लोटकं आणि कंबरेचा झाडू काढला नाही. त्यांची मिरवणूक निघावी, म्हणून त्यांनी आम्हाला जनावरातून माणसात आणलं नाही. तर आम्हाला सर्व जाती धर्माप्रमाणे समाणतेची वागणूक मिळावी. खर्या अर्थानं आम्ही माणूस म्हणून जगावं. यासाठी त्यांनी दिवस रात्र संघर्ष केला. हजारो संसार उभारण्यासाठी स्व:ताच्या संसाराकडे उभ्या आयुष्यात त्यांना लक्ष देता नाही आलं. आम्हाला माणूस बनवण्यासाठी त्यांनी निस्वार्थीपणे मनुवाद्यांशी संघर्ष केला. एवढा त्याग त्यांनी सहन केला. ते केवळ त्यांची जयंती साजरी करण्यासाठी नाही. आणि आज ही आम्ही तेच करत आलोय.
     बाबासाहेबांचे विचार आम्ही कधीच आत्मसात केले नाही. त्या काळच्या शाहीरांनी आणि जलसा कारांनी सांस्कृतीक चळवळीतून त्यांचे विचार शहरात, खेडोपाडी, वस्त्या-वस्त्यात घरा-घरात पोहचवले. आज त्यांच्या जयंतीला DJ वाजवला जातो. मिरवनुकीपुढे नाचलं जातं. पण DJ वाजवून आणि नाचून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचनार का? शेतात भर उन्हात राबनारी माऊली या जयंतीला चार पाचशे रुपये वर्गणी न चुकता देते. एसी ऑफिसमध्ये बसनारा आमचा साहेब ही पाचशे हजार रुपये वर्गणी देतो. आणि आम्ही त्या पैशाची धुळंदान करतो. बाबासाहेबांच्या जयंतीला आणि मिरवणूकीला पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. तोच पैसा समाजातल्या गरीब हुशार मुलांच्या शिक्षण उच्चशिक्षणासाठी खर्च केला, वस्त्यांमध्ये ग्रंथालयांची उभारणी केली, शैक्षणीक संस्था उभारल्या तरच बाबासाहेबांच कार्य पुर्णत्वास जाईल. पण जर का मी असं जयंती मंडळाला बोललो. तर जयंतीला विरोध करतोस म्हणून मलाच विरोधक समजतील. मग तुमच्या विचारांचा वारसा आम्ही कसा पुढे नेणार?
      बाबासाहेबांची जयंती जर साजरी करायचीच असेल, तर त्यांच्या विचारांची जयंती साजरी केली पाहीजे. त्याचे विचार समाज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचवले पाहीजे. तरच बाबासाहेबांना अपेक्षीत असणारा भारत घडू शकेल. गरीबी आणि दारीद्र मुळे आजचा तरुण व्यसनाधीन बनत चालला आहे. अजून ही समाजात शिक्षणाला फारसं महत्व दिल जातं नाही. शिक्षणापासुन वंचित असलेल्या घटकाला त्याच्या हक्काचं शिक्षण मिळवून दिल पाहीजे.
    भारतातल्या सर्व स्त्रीयांना पुरुषांबरोबर समान वागणूक, समान अधीकार मिळावा अशी तरतूद बाबासाहेबांनी घटनेत केलेली आहे. पण स्त्रीयांनी समाजात चाललेल्या कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेऊ नये, म्हणून त्यांच चाललेलं काम बंध कसं पाडता येईल याचा विचार आपनं प्रत्येकजन करतोय. जर बाबासाहेबांनी केलेल्या कायद्याचे पालनं आम्हीच करत नसेल तर या देशातले राजकारणी, राजकीय पक्ष, भारतातले हे लोक या घटनेचे पालन कसे करतील. आपण त्या स्त्रीयांना त्याचा अधीकार केंव्हा देणार.
माझ्या गावात जयंतीनीम्मीत स्त्रीयांनी तुमच्या (बाबासाहेबांच्या) विचारांची चळवळ सुरु केलीय. पण आम्हीच त्या स्त्रीयांना मागे ओढतोय. त्या स्त्रीयांना आमचेच शिक्षीत आणि अशिक्षीत कार्यकर्ते विरोध करतायतं. तसही राज्यघटना सुपुर्द करताना तुंम्ही तुमच्या शेवटच्या भाषणात बोलले वाक्य मला आज ही आठवतय. घटना किती ही चांगली असो या घटनेचे पालन कर्ते जर निट नसतील तर ती घटना बिनकामाची आहे. आणि घटना कितीही वाईट असो या घटनेचे पालन कर्ते लोक जर व्यवस्थीत, काटेकोर पणे पालन करतील तर तिच घटना खुप काळ टिगते.
बाबासाहेब म्हणाले होते की, या देशात न्याय मागुन मिळतं नाही तर तो मिळवावा लागतो. समाजाचा सर्वांगीन विकास करायचा असेल तर राजकीय सत्तेत गेल्या शिवाय पर्याय नाही असे म्हणून त्यांनी आम्हाला शासनकर्ती जमात बनायला सांगीतलं होतं. पण आज ही आंम्ही गावापासुन दिल्लीपर्यंत राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेलेलो आहे. आम्ही त्याच्याचं पायाखालची धुळ चाटतो आहे.
   
    पण बाबा, एक दिवस येणार आणि तुमच्या विचाराचा आणि विचारांचाच वारसा अंखड चालू राहणार.
                               के.प्रफुल्ल

No comments: