कोणताही माणूस इतर माणसांशिवाय एकटा राहू शकतो का? राहतं असेल तर कसा? स्त्री सोबत पुरुष, पुरुषा सोबत स्त्री, पुरुष पुरुष किवी स्त्री स्त्री ही सारी माणसं एकमेकांचं आयुष्य पुढं ओढायला हवे असतात. मग त्यांच नातं कोणतही असो. आई वडील, भाऊ बहिण, मित्र मैत्रीण किंवा नवरा बायको. प्रत्येकाकडे स्व:ताची एक मोकळी जागा असते. त्या मोकळ्या जागे मध्ये तो कोणाला नं कोणाला स्थान देतं असतो. आपण जगत असताना खुप सारी माणसं आपल्या आयुष्यात सतत येतं असतात. समाजातली माणसं. शाळा कॉलेज मध्ये भेटणारी नव नवी माणसं(मित्रमंडळी) ऑफिसातली माणसं. रोजच्या प्रवासात भेटणारी माणसं. दैनंदिन जिवणात दररोज भेटणारी माणसं. हि सारी माणसं जसजशी आपल्या आयुष्यात येतात, तसं त्यांच्यासाठी आपण आपल्या आयुष्यात ती मोकळी जागा तयार करतो. त्यानां स्व:ताच्या आयुष्यात अनंन्य साधारण स्थान देतो. सतत भेटनं, बोलनं, एकमेकांच्या अडचणींना सोमोरं जानं या साऱ्यानं आपण एकमेकात गुरफटून गेलेलो असतो. पुढंं हिच माणसं आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग होऊन जातात. इतकं महत्व आपण काही माणसांना देतं असतो. हि माणसं आपल्या आयुष्यात शेवट पर्यंत असतात का? खरतर अशी माणसं आपल्या संपुर्ण आयुष्यात सोबतं असावीत असं आपल्याला वाटत असतं. पण काही माणसं कोणत्या नं कोणत्या कारणानं मधेचं सोडून वेगळे होतात. हि माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्याचा त्रास आपल्याला होत राहतो. त्यांच्या सोबत झालेल्या संभाषणामुळे, त्यांचा भेटींमुळे, त्यांच्या सवयींमुळे तो माणूस जरी आपल्या आयुष्यातून निघून गेला तरी तो कायमस्वरुपी आठवत राहतो. मग कालांतराने आपण स्वता:ला सावरु लागतो. या मध्ये बराचसा काळ लोटलेला असतो. सोडून गेलेल्या व्यक्तीची पुसटशी आठवण आपल्या मनात असतेचं. ती आठवण लवकर पुसली जात नाही. तरीही ती विसरण्याचा प्रयत्न आपण करु लागतो. मग सोडून गेलेल्या व्यक्तीची पोकळी कशी भरुन काढायची यासाठी पुन्हा एका अश्याचं माणसाची आपल्याला गरज लागते. याच गरजे पोटी आपण पर्यायी व्यक्ती शोधू लागतो.
माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो म्हणजे नेमकं काय? समजा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं प्रेम असेल किंवा चांगले मित्र असतील. त्याने तीच्याशी किंवा तीने त्याच्याशी अचानक बोलनं बंद केलं तर काय होईल? तीने किंवा त्याने तिच्याशी किंवा त्याच्याशी कायमचं बोलनं बंद केलं तर काय होईल? त्यांची माणसीक अवस्था काय होईल? हे बहुदा सर्वांनीचं अनुभवलं ही असेल. तसचं जर एखादा चांगला माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेला. तर आपण मानसिक विकलांग होतो. मग सोडून गेलेल्या माणसाचा आणि आपला नातेसंबध काहीही असो. मित्र, मैत्रीण, मानलेला भाऊ, बहिण, आई, वडील, प्रियकर, प्रियसी किंवा जगातलं कोणतंही नातं असो. ही माणसं आपल्या आयुष्यातून गेल्यावर खुप मोठी पोकळी तयार होते. मग आपण अनेक मानसिक अवस्थेतून जात असतो. आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. माणसांपासून दुर रहावसं वाटतं. बंद खोलीत डांबून ठेवल्यासारखं एकटं रहावसं वाटतं. जगातल्या माणसांपासून दुर जावसं वाटतं. कारण सोडून गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला अस्वस्थ करत असतात. आपल्या मनातली घुसमट सोडून गेलेली व्यक्ती सोबत नसल्याची सतत जाणीव करुन देतं असतात.
जेंव्हा अश्याच व्यक्ती आपल्या आयुष्यातून जात असतात तेंव्हा आपल्याला ही त्याचा मानसिक त्रास होऊ लागतो. मग आपल्याला एकटेपणा हवा असतो. कोणत्याच माणसांसोबत मिसळावस वाटतं नाही. आपण आणि आपलं काम एवढचं रममान जगतं जातो. पुढंं जगतं असताना पुंन्हा नव्या माणसांच्या भेटीगाठी होतात. पण ती माणसंं आपल्या जगण्याचा भाग होऊन जाईल इतकं स्थान त्यांना आपण आपल्या आयुष्यात देतं नाही. कारण भुतकाळातल्या अनुभवाने माणूस सोडून गेल्यावर होणारा त्रास आपण अनुभवलेला असतो. मग कामा पुरती माणसंं बाळगण्याची सवय कित्येक जणांना लागून जाते. जेंव्हा आपण आपल्या कामावर, अभ्यासावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करतो, तेंव्हा आपण माणसांशिवाय जगू लागतो. तेंव्हा आपल्याला कळतं कि जगण्यासाठी आपल्याला कुठल्याही माणसाची गरज नाही. त्या घडीला आपण स्वतंत्र एकटे जगण्यास पात्र ठरतो.
आपल्या ध्येया पर्यंत पोहचण्यासाठी आपल्या आयुष्यात माणसांची आवश्यकता आणि त्यांचा सहवास किती उपयोगाचा आहे. हे आपण स्व:ता ठरवनं गरजेचं आहे. समाजात वावरताना दोन प्रकारची माणसं आपल्याला नेहमी दिसतात. एक म्हणजे खुप मोठा नातेसंबध आणि मित्र परिवार असलेली माणसंं. आणि दुसरं म्हणजे कमी, मोजका मित्र परिवार असलेली माणसं. ज्या माणसाजवळ अनेक नातेसंबध, मोठा मित्र परिवार असतो, तो स्व:ता च्या दैनंदिन कामातून मिळणारा मोकळा वेळ सतत त्यांच्या अडचणी आणि गुंतागुंती सोडवण्यात घालवतो. पण ज्या माणसाजवळ नातेसंबध, मित्र परिवार मोजका, कमी असतो, त्याचा हा महत्वाचा उमदिचा वेळ तो स्व:ता ला देतो. स्व:ता चं ध्येय पूर्ण करण्यास देतो. या दुसऱ्या प्रकारची माणसं प्रत्येक क्षणी यशस्वी होतं असतात.
© के. प्रफुल्ल


